• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सियानंतर उर्मिलाचं भयानक कांड; लग्नाच्या 3 दिवस आधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, धक्कादायक कारण समोर

July 14, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील सिया आणि चेतनने मिळून केलेलं केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेत असताना आणखी एक भयानक कांड उघडकीस आलं आहे. झारखंडच्या गिरीडीहमध्ये एका तरुणीने होणार्‍या नवऱ्याची लग्नाच्या तीन दिवस आधीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तरुणीचे बहिणीच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात होणाऱ्या लग्नामुळे अडथळा निर्माण होत असल्याने दोघांनी मिळून हत्या करण्याचा कट रचला. दोघांनी मिळून हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यातील जमुआ पोलीस स्टेशनमधील हे प्रकरण आहे. भिखोडीह गावातील 21 वर्षीय नीरज हाजरा हा 5 जुलै रोजी अचानक घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी नीरज हा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध सुरू केला. काही दिवसांनी नीरजचं अपहरण झालं असावं, असा संशय त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला. यामुळे पोलिसांनी अधिक गांभीर्याने तपासाला सुरुवात केली.

गिरीडीहचे पोलीस अधीक्षक डॉ. विमल कुमार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश दिले. पथकाने त्याचं मोबाईल लोकेशन, कॉल डिटेलची माहिती जाणून घेतली. यावेळी तपासात पोलिसांना महत्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला. गिरीडीहचे पोलीस त्याच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनचा शोध घेत बिहारच्या जमुई जिल्ह्याच्या बिचकोडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेला जंगलात पोहोचले. त्यानंतर या जंगलात काही दिवसांपूर्वी एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. जंगलातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा नीरज हाजराचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे नीरजची हत्या झाल्याचे उघड झाले.

लग्न ठरल्यानंतर रचला हत्येचा कट

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गिरीडीहच्या गमतरिया गावातील उर्मिला कुमारीचं तिचा दाजी सुभाष पासवानशी प्रेमसंबंध होते. दोघे जण अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांचे प्रेमसंबंध सुरू असताना घरातील सदस्यांनी उर्मिलाचं लग्न नीरज हाजराशी ठरवलं. दोघांच्या लग्नासाठी फक्त 3 दिवस उरले होते. परंतु उर्मिलाला नीरजशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे तिने दाजीच्या साथीने नीरजची हत्या करण्याचं ठरवलं. दोघांनी नीरजची हत्या करून बिहारच्या जंगलात मृतदेह फेकला. दोघांनी मिळून पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात दोघांचा गुन्हा उघडकीस आला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in