
संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरत सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात, विस्तार होऊ शकतात आणि काही नाव चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील देखील काही नावांची चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. फडणवीस केंद्रात गेलेच मंत्री म्हणून तर राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात, असा मोठा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात. सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही, असं राऊत स्पष्टपणे म्हणाले. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100 टक्के बावनकुळे यांचा विचार आणि शिफार, स्वत: देवेंद्र फडणवीसचं करतील, हे माझं आकलन आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.
बातमी अपेडट होत आहे.
Leave a Reply