• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…

July 23, 2026 by admin Leave a Comment


संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे कामकाज वारंवार ठप्प होत आहे. आजही कामकाज ठप्प झाल्यानंतर संसदेबाहेर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांना पत्रकारांनी कामकाजाबाबत प्रश्न विचारला होता. यानंतर त्या भडकलेल्या पहायला मिळाल्या. तुम्ही नेहमी सरकारला हवे असलेलेच प्रश्न विचारता. हेच प्रश्न सरकारला का विचारत नाही? असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रियंका गांधी भडकल्या?

संसदेच्या बाहेर पडताच पत्रकारांनी त्यांना संसदेचे कामकाज बंद का असा प्रश्न विचारला. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘तुम्ही नेहमी सरकारला हवे असलेलेच प्रश्न विचारता. हेच प्रश्न सरकारला का विचारत नाही? मंत्री बाहेर येऊन बोलत आहेत, पण पंतप्रधान अजून एकदाही संसदेत आलेले नाहीत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून इतके मोठे आंदोलन करत आहेत, तरीही पंतप्रधानांनी याबाबत संसदेत एक शब्दही बोललेला नाही, आणि तुम्ही मला विचारता की संसद का चालत नाही?’

VIDEO | Parliament Monsoon Session: Congress MP Priyanka Gandhi Vadra, says, “You always ask the questions that this government wants you to ask. Why don’t you put these questions to the government instead? Ministers are coming out and speaking, but the Prime Minister has not… pic.twitter.com/Ki0Q1qbxan

— Press Trust of India (@PTI_News) July 23, 2026

सरकारला प्रश्न विचारा

पुढे बोलताना त्यांना म्हटले की, ‘मला विचारा, विद्यार्थ्यांसाठी काय केले जात आहे? त्यांच्या मागण्यांवर सरकार कोणती पावले उचलत आहे? हे प्रश्न तुम्ही विचारायला हवेत. आणि जेव्हा मंत्री माध्यमांसमोर येतात, तेव्हा त्यांनाही विचारा की तुम्ही राजीनामा कधी देणार? हा प्रश्न तुम्ही विचारला का? केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तुम्ही विचारले का की ते राजीनामा कधी देणार आहेत? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विचारले का की पोलिसांनी लाठीमार का केला? इतके विद्यार्थी रुग्णालयात का दाखल झाले? आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे त्यांच्या पालकांशीही संपर्क साधता आला नाही, याचे कारण काय? राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) का लागू करण्यात आला? हे विद्यार्थी दहशतवादी आहेत का? जेव्हा तुम्ही सरकारला हे प्रश्न विचारायला सुरुवात कराल, तेव्हा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन.’ दरम्यान, आता संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा काँग्रेस सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम्ही जिंकलो असतो पण तो आडवा आला… शुभमन गिलने कोणाला व्हिलन ठरवलं? सरळ नाव घेत म्हणाला की..
  • Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
  • रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
  • ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in