• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना 5 हजार कोटींना विकला, संजय राऊत यांचा मोठा दावा

August 13, 2026 by admin Leave a Comment


पक्षात आमचं बहुमत असताना निवडणूक आयोगाने आमचा पक्ष अमित शाह यांच्या दबावाखाली एकनाथ शिंदे यांना 5 हजार कोटींना विकला आहे. निवडणूक आयोगात सेटिंग आणि बेटिंग करणं यात जनतेचे 5 हजार कोटी खर्च झाले. अमित शाह यांच्या शेअर मार्केटमधून आमचा पक्ष विकला गेला, असा आरोप करतानाच आमचाच नव्हे तर निवडणूक आयोगाने आणखी चार पक्ष विकले, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्यापर्यंत चालणार असल्याचंही सांगितलं.

आम्ही शिवसेना घटनात्मकरित्या चालवली. आमच्या पक्षाची घटना होती. पक्षामध्ये आमचं बहुमत असताना आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेंना 5 हजार कोटींना विकला. मी आकडा सांगतो. त्याची किंमत 5 हजार कोटी. यात निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत? त्याचा हिशोब ते देतील. या प्रक्रियेत 5 हजार कोटी खर्च झाले आहेत. आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, गोव्याला आणणं, निवडणूक आयोगात सेटिंग आणि बिटिंग करणं यात जनतेचे 5 हजार कोटी खर्च झाले आहेत. हा पक्ष अमित शाह यांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला. निवडणूक आयोगाने त्यात दलालाची भूमिका बजावली. पक्ष विकण्यात निवडणूक आयोग हा एजंट आहे. निवडणूक आयोगाने असे चार पक्ष विकले आहेत. आमचा, पवारांचा, तृणमूल आणि मधल्या काळात अजून एक पक्ष, असे चार पक्ष विकले. लोकशाहीची विक्री निवडणूक आयोग करत असेल तर देशात उरलं काय? हा आकडा खरा आहे. पण मिंद्यांचे लोक अधिक आकडा सांगू शकतील. कुणाला किती दिले याचा मी हिशोब केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

भ्रष्टाचाराला पुरावे असतात का?

पक्ष विकला गेला याला काही पुरावे आहेत का? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर, भ्रष्टाचाराला पुरावे असतात का? एखादी घटना आणि लोकशाही विकली जात असेल तर पुरावे असतात का? त्यांनी पक्ष विकला हाच पुरावा आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात गेलो आहे. शिंदेंना हा पक्ष मेरिटवर मिळाला नाही. हा पक्ष विकला गेला. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला गेला. मिंद्यांनी किंमत मोजली. त्यात अमित शाह सहभागी होते, असा दावा राऊत यांनी केला.

निवडणूक आयोगाचे विचित्र युक्तिवाद

पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद महत्त्वाचा आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंना पक्ष सोपवला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पक्षाची घटना तयार केली. ती घटना निवडणूक आयोगाला कळवली. त्याच्या रितरस पोचपावत्या आमच्याकडे आहेत. पण, हा पक्ष अलोकशाहीवादी आहे. असे विचित्र युक्तिवाद निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्णयात दिले आहेत. पक्ष आणि चिन्हच महत्त्वाचे आहेत, असंही ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in