
मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणात संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, दरम्यान या आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत होता. आज या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी झालेला एक तरुण देखील होता, या तरुणावर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे, यावरून आता राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हला का करण्यात आला? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply