
पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडानंतर समाजात पसरलेली दहशत कायम असल्याचे समोर आलं आहे. देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणामुळे आता लग्न जुळवण्याधी गुप्तहेरांकडून बॅकग्राऊंड तपासण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. पालक केवळ कुंडली आणि नातेवाईकांच्या माहितीवर अवलंबून राहत नाही. तर गुप्तहेरांकडूनही माहिती मिळवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. आता लग्न जुळवताना स्वभाव जुळण्याआधी भावी वर-वधूचा भूतकाळ आणि गुन्हेगारी बॅकग्राऊंड तपासण्याचा ट्रेंड अत्यावश्यक बनल्याचं पालकांकडून सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई आणि आसपासच्या शहरांत खासगी गुप्तहेर संस्थांकडून लग्न जुळवण्याआधी सर्व चौकशी करण्याचा कल वाढला आहे. याबाबत अधिकृत सरकारी आकडेवारी हाती समोर आलेली नाही. मात्र, आता पालक लग्नाच्या बाबतीत कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे. समाजात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. देशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे लग्नाआधी होणाऱ्या सून किंवा जावयाचा भूतकाळ तपसण्याचा कल वाढला आहे. यासाठी पालक 25 हजार ते 3 लाखापर्यंत खर्च करण्याची तयारी करत आहे.
Leave a Reply