
शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम पडतो, तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणूनच कुठे काय बोलावे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कुठे बोलणे टाळावे, याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
चाणक्य नीतीनुसार तुम्हाला राग आलेला असेल तर अशा स्थितीत बोलणे टाळावे. जेवढे शांत राहाल तेवढ्याच लवकर राग शांत होण्याची शक्यता असते. रागाच्या भरात तुम्ही बोलताना चुकीचे शब्द वापरू शकता. त्यामुळे प्रकरण आणखी वाढू शकते, असे चाणक्य नीती सांगते.
एखाद्या वेळी समोरची व्यक्ती तुमचे मत समजून घेण्यास तयार नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीसोबत संवाद न करणे चांगले असते. त्या व्यक्तीसोबत बोलून तुमची उर्जा वाया घालवू नका. अशा ठिकाणी शांत राहणे कधीही चांगले, असे चाणक्य नीती सांगते.
कधी-कधी एखादी व्यक्ती तुम्हाला अन्य एखाद्या व्यक्तीबाबत खूप काही वाईट गोष्टी सांगत असते. अशा स्थितीत तुम्ही तुमचे मत व्यक्त न करणे कधीही चांगले. दुसऱ्यांची निंदा, नालस्ती ऐकताना तुम्ही शांत राहणे कधीही चांगले असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.




Leave a Reply