• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या गावाने महाराष्ट्रातील पहिले गायी- म्हशींचं ब्युटी पार्लर उभारलं ! काय आहे वैशिष्ट्ये ?

April 16, 2026 by admin Leave a Comment


सातारा येथील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने गायी-म्हशींसाठी अनोखे ब्युटी पार्लर उघडले आहे. गावातील गायी म्हशींना नदी ओढ्यावर न धुता गावातच शॉवर खाली धुण्याची आणि त्यांच्या अंगावरील अनावश्यक केस काढण्याची सोय करण्यात आली आहे. राज्यातील गावागावात असणाऱ्या लाखो पाळीव जनावरांना उघड्यावर नदी, तलाव आणि नाल्यात धुतल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हा आशादायक प्रयोग म्हटला जात आहे.

ग्रामविकासाच्या दृष्टीने विविध प्रयोग करण्यात देशात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रपतींनी गौरवलेल्या महाराष्ट्रासह देशात विविध 82 पुरस्कार मिळालेल्या सातारा - पाटण येथील मान्याची वाडी ग्रांमपंचायतीने हा उपक्रम सुरु केला आहे.

ग्रामविकासाच्या दृष्टीने विविध प्रयोग करण्यात देशात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रपतींनी गौरवलेल्या महाराष्ट्रासह देशात विविध 82 पुरस्कार मिळालेल्या सातारा – पाटण येथील मान्याची वाडी ग्रांमपंचायतीने हा उपक्रम सुरु केला आहे.

गावातील पाळीव जनावरांसाठी या ग्रामपंचायतीने अत्याधुनिक स्नानगृह उभारले आहे. या स्नानगृहात जनावरांसाठी शॉवर स्वच्छ पाण्याची सोय गीत संगिताच्या तालावर जनावरांना आंघोळ घातली जाते.  जनावरांच्या अंगावरील अनावश्यक केस या ठिकाणी काढले जातात. त्याच बरोबर घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गावातील पाळीव जनावरांसाठी या ग्रामपंचायतीने अत्याधुनिक स्नानगृह उभारले आहे. या स्नानगृहात जनावरांसाठी शॉवर, स्वच्छ पाण्याची सोय, गीत संगिताच्या तालावर जनावरांना आंघोळ घातली जाते. जनावरांच्या अंगावरील अनावश्यक केस या ठिकाणी काढले जातात. त्याच बरोबर घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आंघोळीनंतर निघणारं पाणी वाया न घालवता त्यावर प्रक्रिया करून ते परसबागेसाठी वापरले जाते. यामुळे एकीकडे जनावरांचे आरोग्य सुधारते तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळत आहे.

आंघोळीनंतर निघणारं पाणी वाया न घालवता त्यावर प्रक्रिया करून ते परसबागेसाठी वापरले जाते. यामुळे एकीकडे जनावरांचे आरोग्य सुधारते, तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळत आहे.

ग्रामीण भागात जनावरांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर असा ठोस उपाय करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा हा प्रयोग आता राज्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. मान्याची वाडीचे सरपंच रविंद्र माने यांच्याशी टीव्ही ९ मराठी चॅलनचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांनी संवाद साधला.

ग्रामीण भागात जनावरांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर असा ठोस उपाय करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा हा प्रयोग आता राज्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. मान्याची वाडीचे सरपंच रविंद्र माने यांच्याशी टीव्ही ९ मराठी चॅलनचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांनी संवाद साधला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bank Scam : या बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, रिझर्व बँकेंची मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का?
  • 17 April Horoscope : 17 एप्रिलच्या दिवशी पडणार पैशांचा पाऊस, नशीब चांगलंच फळफळणार; वाचा राशीभविष्य
  • IPL 2026 : आल्या आल्या शतक, पंजाब विरुद्ध धमाका, क्विंटन डी कॉकचा महारेकॉर्ड, काय केलं?
  • Quinton de Kock: क्विंटन डिकॉकने शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले, रोहित शर्मालाही टाकलं मागे
  • 100 वर्षांची परंपरा आणि 50 लाखांचा विमा! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आजही आहे नंबर 1

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in