• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार? पक्षातूनच विरोध, थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

August 9, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर अनेक नेते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. अशातच आता सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होत असल्याचे समोर आले आहे. तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात तक्रार

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नियक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केली आहे. पक्षाच्या संविधानाला डावलून, अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून तटकरेंची नियुक्ती केली गेली आहे. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

तटकरे अद्याप पदावर कसे?

भाऊसाहेब गोरे यांनी या तक्रारीत तटकरे यांच्या नियुक्तीचा 3 वर्षांचा सामान्य कार्यकाळ जुलै 2026 मध्येच संपुष्टात आला असून कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावर कसे कार्यरत आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच तकटरेंच्या जालना दौऱ्यात अजित पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्याने तटकरेंनी जिल्ह्यातील अनेक पदाधिकार्यांना पदावरून हटवल्याचाही आरोप यावेळी भाऊसाहेब गोरे यांनी केला आहे. त्यामुळे जालन्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावे अशी मागणी

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘अजितदादा असताना पक्षात काही निर्णय झाले होते. त्याची अंमलबजावणी होणार होती. अचानक अजितदादांची ती दुर्दैवी घटना घडली. ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. काल प्रशांत किशोर यांनी सांगितले की प्रांत अध्यक्ष बदलल्याशिवाय मी काम करणार नाही. रणनितीकार निवडणे हा पक्षाचा अधिकार आहे. प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे. अजितदादांची तीच इच्छा होती. प्रदेशाध्यक्ष बदलणार हेच अजितदादांनी आम्हाला सांगितले होते. कदाचित माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत, मंत्री आहेत. त्यांना ही गोष्ट माहिती आहे. पण ते बोलणार नाहीत. पण का बोलायचं नाही. जर पक्ष संघटन मजबूत करायचं असेल तर बदल व्हायला हवा.’



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?
  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in