
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर आज विधान भवनात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सीमावादाशी संबंधित विविध मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील बैठकीला उपस्थित आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा अनेक वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय मानला जातो. सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या प्रश्नांवर राज्य सरकारची भूमिका आणि पुढील रणनीती यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष आता या बैठकीच्या निष्कर्षाकडे लागले आहे.
Leave a Reply