• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मेहुणीवर होती नजर,जावयाला मारले आणि घराजवळ पुरले, पत्नी-सासूसह चौघांना अटक

May 23, 2026 by admin Leave a Comment


बिहारच्या जमुई येथील नात्यालाच काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. मोहनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काला गावात सासुरवाडीत राहणारे ३५ वर्षीय जावई जितेंद्र पंडित याची घरगुती भांडणातून सासू आणि मेहुण्याने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाला घराच्या पाठी तीन फूट खोल खड्ड्यात दफन केले. एवढेच नव्हे तर मृतदेहाचे विघटन लवकर होण्यासाठी खड्ड्यात सुमारे १५ पाकिट मीठ देखील घातले. ही घटना उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी घटनास्थळी टीम पोहचली. त्यानंतर खड्डा खणून या मृतदेहाला बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यास पोस्टमार्टेमसाठी जमुई सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांना या प्रकरणात कारवाई करत मृताची पत्नी, सासू, मेहुणी आणि मेहुणा यांना अटक केली आहे. सर्वांची आता चौकशी केली जात आहे.

जितेंद्र पंडित हा झारखंड येथील मधुपूर भागाचा राहणारा होता. सुमारे १० वर्षांपूर्वी त्याचे लग्न काला गाव येथील रहिवासी रजनी हिच्याशी झाली होती. लग्नाच्या दोन ते तीन महिन्यानंतर तेथेच घरजावई म्हणून सासरवाडीला राहू लागला. त्याला दोन लहान मुले आहे. ज्यात पाच वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

कौटुंबिक वादातून हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावली

माहितीनुसार बुधवारी कुटुंबात कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद झाला. गावकऱ्यांनी सांगितले की कुटुंबात भांडणात शब्दाला शब्द वाढत जाऊन मारहाण झाली. ज्यात जितेंद्र गंभीर रुपाने जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आरोप आहे की यानंतर कुटुंबाने पोलिसांना न बोलवता मृतदेहाला घराच्या पाठीमागे खड्डा खणून पुरले.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र याला दारुचे व्यसन होते त्यामुळे घरात सारखे वाद होत होते. काही लोकांनी त्याच्यावर घरातील महिलांशी अनैतिक संबंध ठेवल्याचाही आरोप लावला आहे. मात्र, या आरोपांना दुजोरा मिळालेला नाही. मृताची पत्नी रजनी यांनी सांगितले की तिचा पती रोज दारु पिऊन मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे नशेत होता. छतावरुन कोसळून त्याचा मृत्यू झाला. पत्नीने कुटुंबातील महिलांशी तिच्या नवऱ्याचे संबंध असल्याचा आरोपांचा इन्कार केला.

पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर कारण कळणार

जितेंद्र पंडित याची आई मालती देवी यांनी या घटनेला हत्या असल्याचे सांगत आपला मुलगा गेल्या १० वर्षांपासून सासुरवाडीत रहात होता आणि कुटुंबाचे सर्वकाही सामान्यपणे सुरळीत सुरु होते. कौटुंबिक वादात आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप मालती देवी यांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र पंडित याचा मेहुणीवर डोळा होता. ज्याचा विरोध त्याच्या सासूने केला. यामुळे घरात भांडणे झाली आणि चिडलेल्या जितेंद्र याने सासूचे एक बोट दाताने चावत तिला गंभीर जखमी केले. जितेंद्र दोनदा तुरुंगातही जाऊन आला होता. पोलिस अधिकारी सतीश सुमन यांनी सांगितले की घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. फोरेन्सिक पुरावे जमा केले जात असून पोस्टमार्टेम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमिर खानने सांगितलं 5 जुलैला कुठे आणि कसं होणार लग्न, गेस्ट लिस्टमध्ये कोण-कोण?
  • शेवग्याच्या शेंगा आणि पानात असतात सर्वाधिक पोषक तत्वं, पाहा कोणती ?
  • मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…
  • एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…
  • अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in