• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताचा चीनला इतिहासातील सर्वात मोठा दणका, थेट वाढली चिंता, हिंद महासागरावर..

April 25, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. युद्धात तणाव कमी व्हायचा तर तो अधिक चिघळत आहे. इराणने स्पष्टपणे अमेरिकेसोबत चर्चा करण्यास आणि एकाच टेबलावर येऊन वाटाघाटी करण्यास नकार दिला. मागच्या बैठकीमध्ये इराण आणि अमेरिका एकाच टेबलावर चर्चेकरिता आले. मात्र, काही यश मिळू शकले नाही. त्यानंतर अमेरिका अधिक आक्रमक झाली. होर्मुज खाडीत तणाव आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अमेरिकेनेही मोठी नाकेबंदी केली. यादरम्यानच तेलाच्या किमती गगणाला पोहोचत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आपली सागरी सुरक्षा रणनीती जाहीर केली आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल डी. के. त्रिपाठी यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या या रणनीतीमध्ये होर्मुज खाडीला एक प्रमुख महत्वाचे क्षेत्र म्हटले आहे. यासोबतच त्यांनी इतरही महत्वाच्या सागरी मार्गाचा उल्लेख केला. या महत्त्वाच्या मार्गांमध्ये केप ऑफ गुड होप, मोझांबिक चॅनल, बाब-अल-मंडेब, सुएझ कालवा, मलाक्का आणि सिंगापूरची सामुद्रधुनी, सुंडा सामुद्रधुनी यांचा समावेश आहे. सुंडा सामुद्रधुनीचा उल्लेख केल्याने चीनच्या पोटात गोळा उठला आहे.

मलाक्का आणि सिंगापूरच्या सामुद्रधुनीचे महत्त्व देखील यात अधोरिखित केले. ही खाडी हिंद महासागराला दक्षिण चीन मसुद्रात प्रशांत महासागराला जोडली जाते. हा मार्ग पर्शियन आखातापासून पूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिकपर्यंतचा सर्वात लहान सागरी मार्ग आहे. मात्र, भारताने महत्वाच्या समुद्री महामार्गांचा उल्लेख केल्यानंतर चीनचे टेन्शन वाढले आहे.

होर्मुजमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत हा सुंडा सामुद्रधुनीमध्ये सक्रिय झाला. ज्यामुळे चीन तणावात आहे. चीनची आता चिंता चांगलीच वाढली. भारत आता तिथे सक्रिय होत आहे. हा चीनला मोठा दणका आहे. हिंद महासागरावर चीनची बारीक नजर आहे. आता भारत सुंडा सामुद्रधुनीवर लक्ष केंद्रीत करत आहे. भारत आणि चीनचे संबंध फार काही चांगले राहिले नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता संबंध चांगले आहेत.

अमेरिकेने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेणारा चीन पहिला देश होता.  तज्ञांच्या मते, होर्मुजच्या सामुद्रधुनीतील कोणत्याही अडथळ्याचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होतो, कारण जगातील तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गातून जातो. सध्याच्या युद्धात विविध गोष्टींवर भारत विचार करत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • त्याने मला घट्ट पकडलं, कार सुरु केली आणि…, मुंबईच्या रस्त्यांवर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
  • Sanjay Dutt Wife Manyata : चित्रपटाच्या घोषणेचा कार्यक्रम पण अचानक काय झालं, संजू बाबाच्या पत्नीला इवेंटमध्ये सर्वांसमोर कोसळलं रडू
  • सावधान! ITR मध्ये चुकीची माहिती भरली तर 200 टक्के दंड, आयकर विभागाचे नवीन नियम लागू
  • Bageshwar Baba: चार मुलं पैदा करा आणि एक… RSS चा उल्लेख करत हिंदू धर्मीयांना धीरेंद्र शास्त्री यांचे मोठे आवाहन काय?
  • मालदीवला जाणाऱ्या भारतीयांना मोठा इशारा, थेट होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा, नवीन..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in