• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

August 24, 2026 by admin Leave a Comment


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असून केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे. फडणवीस यांनी केंद्रात मंत्री होणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी दिल्लीत मात्र फडणवीस यांना मोठी संधी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत एंट्री मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्या दिल्लीतील वाऱ्या वाढल्याचंही सांगितलं जात आहे. संसदीय समितीवर नियुक्ती झाल्यास देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत तर वजन वाढणार आहेच, पण राज्यातही फडणवीस सर्वात ताकदवर नेते होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून ते मंगळवारीही दिल्ली असतील. यामागे भाजपच्या सगळ्यात ताकदवर मानल्या जाणाऱ्या संसदीय समितीत मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते इच्छुक असले तरी मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यात फडणवीसांचा समावेश न होता त्यांची एंट्री संसदीय समितीत झाली तर फडणवीसांची ताकद भाजपात आणखी वाढणार आहे. फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याच्या चर्चा आहे. फडणवीस यांची संसदीय समितीत एंट्री होणारच आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

12 सदस्यांमध्ये फडणवीस येणार

भाजपच्या संसदीय समितीत सध्या एकही मुख्यमंत्री नाही. जर फडणवीसांची एंट्री झाली तर राष्ट्रीय राजकारणात भाजपच्या अंतर्गतही फडणवीसांची ताकद वाढणार आहे. याआधी नितीन गडकरी भाजपच्या संसदीय समितीत होते. पण 17 ऑगस्ट, 2022ला गडकरींना संसदीय समितीतून काढून टाकण्यात आलं. सध्या फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. भाजपच्या संसदीय समितीत सध्या 12 सदस्य आहेत. या समितीत मुख्यमंत्र्यांना सामील करायचे की नाही, याबाबत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

योगी आदित्यनाथ आणि शर्मा

2006साली राजनाथ सिंह यांनी संसदीय समितीतून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बाहेर काढलं होतं. या संसदीय समितीतून भाजपात मुख्यमंत्र्यांची निवड होते, त्यामुळे मुख्यमंत्री या समितीत असेल तर काय होईल; याबाबत सध्या अंतर्गत चर्चा सुरु आहे. सध्या योगी आदित्यनाथ, फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना समितीत सामील करून घेण्याच्या चर्चा सुरू आहेत. पण महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व म्हणून फडणवीसांची संसदीय समितीत मोठी दावेदारी असल्याची चर्चा आहे.

आणखी पॉवरफूल होतील

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 120 सदस्य आहेत. पण भाजपची संसदीय समिती मुख्यमंत्री निवडण्यापासून सगळे निर्णय घेते. त्यामुळे भाजपच्या ताकदवर समितीत फडणवीसांची एंट्री झाली तर ते भाजपात आणखी पावरफुल होण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यतांमुळे फडणवीसांच्या सतत दिल्ली वारी सुरु असल्याची माहिती आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP Delhi Protest : ‘कॉकरोच’ पुन्हा दिल्लीत धडकणार, 5 सप्टेंबरला…सीजेपीची मोठी घोषणा; नवं आंदोलन पेटणार?
  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in