
BRICS समुहाची बैठक भारताची राजधानी दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत जवळपास सर्वच देश उपस्थित राहणार आहेत. मात्र, आमंत्रण असूनही बांग्लादेश या शिखर संमेलनापासून दूर राहणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजून त्यावर स्पष्ट काही कळू शकले नाही. भारत आणि बांगलादेशमध्ये शेख हसीना, तीस्ता नदीचा तणाव यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे बांगलादेशमधील चीनचा वाढलेल्या हस्तक्षेप हा देखील मोठा मुद्दा आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे की, भारताने ब्रिक्ससाठी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना दोन वेळा आमंत्रण पाठवले. बांगलादेशचे विदेश मंत्री खलील उर रहमान यांना पत्रकारांनी या परिषदेला उपस्थित राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यादरम्यान ते शांत राहिले आणि त्यांनी उत्तर देणे टाळले. त्यांनी म्हटले की, मी इथे देशाचा प्रतिनिधी म्हणून बोलत नाही. त्यामुळे मला माफ करा.
या संमेलनाला बांगलादेशचे पंतप्रधान सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केली जात आहेत. व्दिपक्षीय मुद्दा असेल तर मी त्यात बोलेल. बाकी दुसऱ्या गोष्टींवर मी भाष्य करू शकत नाही. रहमान यांना BIMSTEC शिखर संमेलनमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आले. यादरम्यान भारत, श्रीलंका, थायलंड, म्यांमा, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान यांना देखील या संमेलनाकरिता भारताने आमंत्रण पाठवले.
मात्र, या संमेलनात ते सहभागी होणार की नाही याबाबत अजून काही स्पष्टता आली नाही. भारताकडून आमंत्रण असतानाही रहमान यांच्याकडून चीनला जाण्याची तयारी केली जात आहे. अजूनही स्पष्ट नाही की, रहमान नक्की भारत दाैऱ्यावर येणार की नाही. इराण आणि अमेरिका युद्धात भारत बांगलादेश यांच्या मदतीला धावून गेला.
ज्यावेळी बांगलादेशला मदत लागली, त्यावेळी भारताने बांगलादेशची मदत केली. मात्र, आता हे सर्व विसरून भारताच्या विरोधात भूमिका घेताना बांगलादेश दिसत आहे. बांगलादेशचे काही मुख्य सैन्य अधिकारी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्येही गेले होते. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. पाकिस्तानसोबत बांगलादेशची जवळीकता वाढताना दिसतंय.
Leave a Reply