
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विरोधक हा मुद्दा संसदेत लावून धरणार असल्याची माहिती हाती आली आहे. नीट पेपरफुटी आणि पोलिसांच्या पॅलेट गन, लाठीचार्ज विरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. विरोधक या मुद्द्यावरून एनडीए सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार दिल्लीत शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. त्यांच्यावर पॅलेट गनने गोळीबार केला. त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या साथीने काँग्रेस संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत आवाज उठवणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी देखील काँग्रेस करणार आहे. जंतरमंतरवर पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून संसदेत सरकारला बॅकफुटवर आणण्याचा प्लान आहे. सरकारला पावसाळी अधिवेशनच्या उर्वरित दिवसांत कोणताही राजकीय अंजेडा पटलावर मांडता येऊ नये, यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे.
Leave a Reply