
तिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले आहेत. एसीबीने (भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग) त्यांच्यावर १५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करत खटला चालवण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयीन कामकाजात अनुकूल आदेश देण्यासाठी न्यायाधीश काझी यांनी ही लाच स्वीकारल्याचा आरोप एसीबीने केला आहे.
या प्रकरणात, न्यायाधीशांच्या क्लार्कने तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०२२ मध्येच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र यामध्ये निलंबन नव्हे तर खटला चालवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मोठ्या प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप असल्यामुळेही एसीबीने खटला चालवावा अशी तीव्र मागणी केली आहे. लाचखोरीच्या या आरोपामुळे न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसीबी आता याप्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी कायदेशीर परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि न्यायव्यवस्थेच्या वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
Leave a Reply