
तहान लागणे ही शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया आहे. उष्णतेचा सामना केल्यानंतर, अतिप्रमाणात घाम आल्यावर किंवा व्यायाम केल्यानंतर पाणी प्यायल्याने सहसा आराम मिळतो.
पण आपल्यापैकी असे काही लोक आहेत, ज्यांना वारंवार तहान लागते. लगेचच घसा कोरडा पडतो. याकडे आपल्यापैकी अनेक रोग दुर्लक्ष करतात. मात्र, हे एक अत्यंत मोठे संकेत आहेत.
शरीराला फक्त पाण्याचीच नाही तर सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचीही गरज असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यात हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
जेव्हा एखादी व्यक्ती कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी पिते, तेव्हा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स विशेषतः सोडियम — अतिशय विरळ होऊ शकतात. यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल बिघडू शकतो.
यामुळे वारंवार तहान लागण्याचे लक्षण अजिबात चांगले नाही. अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, यासोबतच हे गंभीर लक्षण नक्कीच आहे.




Leave a Reply