
दिल्लीच्या जंतरमंतरवर आज दिवसभर जोरदार आंदोलन झालं. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी कॉकरोच जनता पार्टीने उग्र आंदोलन केलं. तरुणांनी संसदेकडे कूच करताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संध्याकाळपर्यंत जंतरमंतर मैदान खाली झालं. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाऊन आंदोलन धरणे आंदोलन सुरू केलं. जंतरमंतरवर अजूनही आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही, असा पवित्राच आंदोलकांनी घेतल्याने वातावरण पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जंतरमंतरवर शेकडो तरुण टॉर्च घेऊन ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलकांना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. आम्ही येथे ठामपणे उभे आहोत आणि अधिक आंदोलक आमच्यात सहभागी होण्याची वाट पाहत आहोत, असे सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले.
Leave a Reply