
नेपाळला अचानक आलेल्या पुराला नेमके कोण जबाबदार आहे यावरुन बराच खल सुरु आहे.कोणी भूकंपाचा तर कोणी ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड म्हणजे GLOF चा संशय व्यक्त केला आहे. अनेक जण या घटनेला चीनशी जोडत आहेत. आता सॅटेलाईट्स फोटो आणि भूकंपीय आकड्यांचा तपास केला तर या घटनेला वेगळीच गोष्ट जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.
नेपाळ-तिबेटी सीमेवरील लिरुंग ग्लेशियरचा ( हिमनदी ) एक हिस्सा तुटून खाली कोसळला होता. या घटनेनंतर पुढे जाऊन पुर आणि ढीगाराच्या एक धोकादायक लाट निर्माण झाली. याचा परिणा नेपाळ पर्यंत मर्यादित न राहाता वेगाने उष्ण होत असलेला हिमालयाची प्रवृतीत भारतासाठी पुढे जाऊन मोठा धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले जात आहे.
नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ ग्लेशियर ( हिमनदीचा ) एक मोठा भाग तुटून एक किमी दरीत घसरला. त्याच्या सोबत बर्फ, दगड आणि ढीगारा देखील खाली आला. सॅटेलाईट फोटोत ग्लेशियर ते दरीत एक नवीन निशान तयार झाल्याचे दिसत आहे. याच कारणाने येथे कंपनाची नोंद झाली होती.
या ग्लेशियरच्या तुटण्याने नदीचे पात्र वाढून अनेक पट मोठे झाले. स्याफ्रुबेसी नदीच्या किनाऱ्यावरील वस्ती देखील ढीगाऱ्यात दबली गेली. बेट्रावती बाजारात या नदीचा घेरा वाढून ९० मीटर वरुन ४९० मीटर पर्यंत पसरला. बिदूर मध्ये परिस्थिती अशी झाली की येथे नदी १०० मीटर हून वाढून ५४९ मीटर रुंद झाली. आणि शहराचा किनारा या नदीच्या पाण्याने नष्ट झाला.
हा ग्लेशियर तुटला कसा ?
ग्लेशियर ( हिमनदी ) कसा काय तुटला ? संशोधक यामागे बर्फ वितळणे, तापमान वाढणे आणि ग्लेशियरच्या आता पाणी पोहचणे या सारख्या कारणांचा तपास करत आहेत. याला थेट ग्लोबल वार्मिंगचा परिणाम म्हणणे घाईचे म्हटले जात आहे. मात्र हिमालयात बदलते तापमान आणि वेगाने वितळणारे बर्फाने धोक्याला वाढवले आहे. जेव्हा ग्लेशियरमध्ये वितळले पाणी आतपर्यंत पोहचते तेव्हा बर्फ आणि जमीनी दरम्यान घसरण वाढू शकते. अशा स्थिती ग्लेशिअरचा कोणताही भाग अचानक तुटू शकतो.
Leave a Reply