• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देवाकडे आपण काय मागायला पाहिजे? दिविजा फडणवीसांनी शेअर केला खास व्हिडीओ, दिला मोठा संदेश

September 4, 2026 by admin Leave a Comment


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस या देखील सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आपण सर्वजण देवाकडे काय मागतो? आणि काय मागितलं नाही पाहिजे? याबद्दल या व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. देवाची भक्ती कशी करावी? देवाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे? यासंदर्भात त्यांनी फार सुंदर असं विवेचन या व्हिडीओमध्ये केलं आहे.

आपण सर्वजण देवाकडे काय मागत नाहीत? देवा हे काम कर, देवा ते काम कर परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? देव तुमच्याकडे काय मागतो? चला तर मी तुम्हाला सांगते. भगवत गितामध्ये श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती त्यांना प्रेम, भक्ती आणि अपुलकीने फळ, फूल, पाणी किंवा एखाद्या झाडाचं पान जरी तुम्ही देवाला अर्पण केलं तर तो भक्त श्रीकृष्णासाठी प्रचंड प्रिय असतो, असं या व्हिडीओमध्ये दिविजा फडणवीस म्हणताना दिसत आहेत.

नेमकं काय म्हणाल्या दिविजा फडणवीस?

‘हरे कृष्ण, आपण सर्वजण देवाकडे काय मागत नाहीत? देवा हे काम कर, देवा ते काम कर परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? देव तुमच्याकडे काय मागतो? चला तर मी तुम्हाला सांगते. भगवत गितामध्ये श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती त्यांना प्रेम, भक्ती आणि अपुलकीने फळ, फूल, पाणी किंवा एखाद्या झाडाचं पान जरी तुम्ही देवाला अर्पण केलं तर तो भक्त श्रीकृष्णासाठी प्रचंड प्रिय असतो. त्यामुळे असा अर्थ बिलकून नाहीये की, तुम्हाला देवाचा सर्वात प्रिय भक्त होण्यासाठी खूप सारे फळ किंवा फूल अर्पण करण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सांगू इच्छितात की, या जगात त्यांच्यासाठी तुमचं प्रेम आणि भक्तीपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला या श्रीकृष्ण जन्माष्टमीला विनंती करते की, थोडा वेळ काढून देवाकडे भौतिक सुख देणाऱ्या गोष्टी मागू नका. परंतु तुम्ही भगवान श्रीकृष्णावर प्रेम करा. तुम्ही त्यांची अपुलकीने आणि प्रेमाने भक्ती करा, साधना करा, आणि त्यांचं चिंतन करा. हरे कृष्णा’ असं दिविजा फडणवीस यांनी म्हटलं आहे.  त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in