
खरं म्हणजे मद्यपान हे आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. सतत मद्यपान केल्यास तुमच्या यकृतावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मद्यप्राशन करू नका, असा सल्ला दिला जातो.
पंरुत या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून देशात कोट्यवधी लोक आवडीने मद्यपान करतात. मद्यपान करण्याविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. मद्याची नशा कधी आणि केव्हा चढते, याबाबतही अनेक मतमतांतरं आहेत.
तसं पाहायचं झालं तर तुमच्या पोटात अन्न आहे की नाही, यावरून तुम्हाला मद्याची नशा कधी आणि किती येणार हे अवलंबून असते. तुमचे पोट रिकामे असेल म्हणजेच तुम्ही काहीही खाल्लेले नसेल तर मद्याची नशा लवकर येते.
पोट रिकामे असेल तर पिलेले मद्य लवकर रक्तात मिसळते आणि त्याची नशा लवकर चढते. अशा स्थितीत कधीकधी मळमळ होणे, चक्कर येणे, उलटी होणे अशा प्रकारचा त्रास जाणवू शकतो. म्हणून योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply