
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. काहीही झालं तरी सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मी माझे उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. अशातच गेल्या काही काळापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. शिंदे यांना टार्गेट केल्यामुळे शिवसेनेचे नेते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी तर जरांगे यांना थेट इशारा दिला होता. आमच्या नेत्याला लक्ष्य केलं जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असं गोगावले यांनी म्हटले होते. याला आता जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ आहात…
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘मी तयार आहे कधीही सज्ज आहे, तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ आहेत. माझ्या नादाला लागायचं नाही. माझ्याकडे पुरावा आहे. मीडियात पुरावा देईन मी शिंदेंवर बोलणार आहे. तुम्ही मराठ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्यांच्या बाजूने बोलू नका. मग तुमच्यापेक्षा तटकरे बरा म्हणावं लागेल. होऊ दे काय व्हायचं ते.
शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये…
पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘तुम्हाला आरक्षण द्यायचा कंटाळा आला असेल आणि यावर त्यावर बोलू नका असं म्हणायच असेल तर तुम्ही फक्त कारण देत असाल तर शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये. आरक्षण द्यायच्या वेळेला यांच्यावर बोलू नका, त्यांच्यावर बोलू नका असं सांगणं योग्य नाही. तुम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे नसतील तर अंतरवालीत येऊ नका. तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करून संपून जाणार आहे. तुम्ही काय आहे करता तेही आम्ही बघू.
…तर मुंबई ठप्प पडेल
जरांगे पाटलांनी पुढे बोलताना म्हटले की, आपण कुणाला काय बोलायचं, आपण काय कुणाचे गुलाम आहोत काय? आपण यांना भाकर मागितली, त्यांनी नाही दिली. महाराष्ट्रातील मराठ्यांना मी सांगतो की 12 तारखेला मुंबईला जायचं की नाही जायचं? मराठ्यांनी मुंबईला प्रदक्षिणा घातली तर मुंबई ठप्प पडेल. जाळपोळ करुन काही मिळणार नाही. फक्त सगळ्यांनी सावध राहा.
Leave a Reply