
मनोज जरांगे पाटील यांनी गणपती उत्सवादरम्यान मुंबईत दाखल होऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवरायांना मानणाऱ्यांनी हिंदूंच्या सणांमध्ये विघ्न आणू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जरांगेंच्या मुंबई आंदोलनाच्या घोषणेवर फडणवीसांची ही प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply