
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज वितरीत करण्यात आला आहे. एका क्लिकद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. आज एकाच दिवशी ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १२ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना १० हजार ११५ कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही कर्जमाफी योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
Leave a Reply