
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक जिवलग मित्र असतो ज्याला आपल्या बालपणापासूनच्या अनेक गोष्टी माहिती असतात. मात्र, विश्वास आणि प्रत्येक वैयक्तिक गोष्ट सांगणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
वय वाढत जाते तशी काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणे अधिक योग्य असते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य सुरक्षित राहते आणि मैत्रीचे नातेही अधिक मजबूत राहते.
तज्ज्ञांच्या मते, जोडीदारासोबत होणारे प्रत्येक छोटे-मोठे वाद मित्रांना सांगणे टाळावे. नंतर वाद मिटला तरी मित्रांच्या मनात जोडीदाराबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते. मात्र, मानसिक किंवा शारीरिक छळासारखे गंभीर प्रकार असतील तर विश्वासू व्यक्ती किंवा तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.
याशिवाय, मोबाईलचा पासवर्ड, यूपीआय पिन, ई-मेल किंवा बँक खात्याशी संबंधित कोणाशीही माहिती शेअर करू नये. तसेच, इतरांनी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगणे टाळावे. यामुळे विश्वास टिकून राहतो.
नवी नोकरी, परदेशात जाण्याची योजना किंवा इतर महत्त्वाचे निर्णय पूर्णपणे निश्चित होईपर्यंत त्यांची चर्चा न करणे फायदेशीर ठरते. तसेच, स्वतःच्या असुरक्षितता किंवा कमतरतांबद्दल सतत बोलणेही टाळावे. अडचणी मोकळेपणाने मांडाव्यात, पण त्या आपल्या ओळखीचा भाग बनू देऊ नयेत.




Leave a Reply