• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘ऑपरेशन टायगर’चा आज फैसला! घडामोडींना वेग, आदित्य ठाकरे यांचा ओमराजे निंबाळकर यांना प्रतिसाद, थेट..

June 21, 2026 by admin Leave a Comment


ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फोडले. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही बंडखोरी केली. बाकी 5 खासदार शिवसेना शिंदे गटाकडून अज्ञातस्थळी हलवण्यात आले. मात्र, ओमराजे निंबाळकर वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाच्या केसचा निर्णय असल्याने आपल्या कुटुंबियांसोबत आहेत. काल त्यांना मोठा धक्का बसला. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात सर्व आरोपींनी पुरावे नसल्याने कोर्टाने निर्दाेष मुक्तता दिली. त्यानंतर आपली राजकीय भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचा निर्णय ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. त्यापूर्वीच आपल्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना ओमराजे निंबाळकर दिसले होते. त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. फक्त हेच नाही तर त्यादरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही बोलताना ते दिसले.

वडिलांच्या केसचा निकाल आपल्याच बाजूने लागावा, याकरिता ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटात जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. आता ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी शिवसेना ठाकरे गटाकडून केली जात आहे. याकरिता ओमराजे निंबाळकर यांचे अत्यंत जवळचे त्यांच्या जिल्ह्यातील दोन आमदारांना कामाला लावले.

काल आमदार कैलास पाटील थेट मातोश्रीवर पोहोचले होते. जर ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा निर्णय बदलला तर 5 खासदारांची खासदारकी धोक्यात येऊ शकते, ज्यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली. यामुळेच आपले 6 खासदार परत आणण्याकरिता शिवसेना ठाकरे गटाकडून जोर लावला जात आहे. आज ऑपरेशन टायगरच्या फैसला होणार आहे. आज धाराशिवमध्ये होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत, तिथेच फैसला होणार आहे.

5 खासदारांची राजकीय भविष्य धोक्यात आहे. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ओमराजे निंबाळकर आपला निर्णय घेणार आहे. तिथेच स्पष्ट होईल की,एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले की, नाही. त्यामध्येच मध्यरात्रीच कैलास पाटील आणि वरूण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. ज्याने घडामोडींना वेग आला.

ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते की, मी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर यापूर्वी कधी बोललो नव्हतो, बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही. याला प्रतिसाद देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांचे मन मोठे आहे, ज्यांना परत यायचे आहे, त्याचे स्वागत आहे. पक्षाच्या विरोधात जातील, त्यांच्यावर कारवाई होणार. ओमराजे निंबाळकरांशी कुठलाही संपर्क झाला नाही, त्यांचे तळ्यात मळ्यात असो पण डुबायला नको हे त्यांच्यावर आहे,असे स्पष्ट आदित्य ठाकरे यांनी म्हटले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?
  • ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in