• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली

August 31, 2026 by admin Leave a Comment


एसआयआरच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्रातल्या दोन कोटी सात लाख मतदारांची नावं वगळली आहेत. यादीत नाव नसलेल्यांना 30 सप्टेंबरपर्यंत तक्रार करता येणार आहे. एसआयआर मोहिमेत महाराष्ट्रातल्या दोन कोटी सात लाख मतदारांची नावं वगळण्यात आलीयेत. नावं वगळल्यानंतरची पहिली यादी निवडणूक आयोगानं जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार यातल्या काही मतदारांनी फॉर्म जमा केले नाहीत. काही मतदारांकडे रेकॉर्ड डिजिटाईज झाले नाही. काही मतदार प्रत्यक्ष पाहणीवेळी अनुपस्थित होते. काही मतदार दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत. काही मतदारांचा मृत्यू झालाय. तर काही मतदारांची नावं यादीत दोन वेळा होती. दरम्यान पहिल्या यादीतून नाव गायब असलेल्या मतदारांना 30 सप्टेंबरपर्यंत तक्रार करण्यात येणार आहे. मतदार यादीत पुन्हा नाव घालण्यासाठी फॉर्म 6, तक्रार करण्यासाठी फॉर्म 7, तर पत्ता बदलण्यासाठी फॉर्म 8 भरावा लागेल. या तक्रारींचं निवारण 29 ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार आहे. तक्रारींचं निवारण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in