
मुंबई महानगरपालिकेतील भाजप आणि शिवसेनेतल शीतयुद्ध सुरूच आहे. शिंदेच्या शिवसेनेकडील सुधार समितीच्या कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर आता शिवसेनेनही भाजप संदर्भात तक्रार केली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या प्रतिनिधींचे प्रस्ताव सभागृहात पूर्व सूचने शिवाय न वाचताच भाजपकडून तहकूब केले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय. सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांचे पती विपुल दोशी सुधार समितीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला होता. मात्र या संदर्भात भाजप नगरसेवकच विपुल दोशी यांच मार्गदर्शन मागण्यासाठी येतात. ते समिती बैठकीत कुठेही हजर नसतात असं स्पष्टीकरण संध्या दोशी यांनी दिलय. सभागृह नेता यांनी विषय क्रमांक 21 तहकूब असं फक्त उल्लेख करून तो पुढे ढकलण्यात आला. तर ते विषय त्या बाबतीत घडण्यात आल तर हे असं घडलय ते कुठेतरी चुकीचं घडलय. मला पक्षाने ही जबाबदारी दिलेली आहे. आमच्या पक्षाची जबाबदारी जबाबदारीच पद म्हणून या ठिकाणी मी बसलेली आहे. म्हणून या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की जबाबदारी जबाबदारी घेतली जी खांद्यावर आपण आहे त्या जबाबदारीच उत्तर सुद्धा आम्हाला माझ्या पक्षाला द्याव लागणार. म्हणून यापुढे असं कधी कामकाज आपल्या महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशन मध्ये होऊ नये. सगळ्या गोष्टी मांडल्या जातात इथे, त्यांचा अजेंडा सेट केला जातो आणि त्यानंतर नगरसेवकांना कळवणं जातं आणि त्यानंतरच तो डिसिजन होतो. मग सुधार समितीच्या अध्यक्ष सन्माननीय संध्या दोशी असो किंवा स्थायी समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रभाकर शिंदे असो. तर या दोन्ही गोष्टी समन्वयाने चालू आहेत. हे कोण बोललं, काय बोललं, याच्यात कुठेच ऑफिशियली की कुठून भाजपच्या सोर्सेसनुसार नाही आलंय किंवा शिवसेनेच्या माध्यमातून आलं नाहीये. म्हणून या विषयावरती किती चर्चा करावी हे त्यांनी ज्यांनी त्यांनी, कोणी ही बातमी दिलीये त्यांनी ठरवावं.
Leave a Reply