• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक किलो भुईमुगाच्या शेंगातून किती तेल मिळते? तब्बल..

July 9, 2026 by admin Leave a Comment


बाजारात सध्या शेंगदाण्याच्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्येच इराण आणि अमेरिका युद्धात खाद्यतेलाचेही भाव वाढत आहेत. बाजारात भुईमुगाच्या शेंगा 100 ते 130 रुपये किलो मिळत आहेत. जर आपण भाजी मंडईत या शेंगा घेतल्या तर यापेक्षाही अधिक स्वस्त मिळतील. मात्र, या शेंग्यांपासून तयार केलेले तेल 400 ते 450 मिली लीटर आहे. पण मग बाजारात शेंगदाणा तेलाचे 250 मिलीलीटरचे पाकीट 50 ते 70 रुपयांना कसे विकले जाते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी, शेंगदाण्यापासून तेल निर्मिती प्रक्रिया कशी केली जाते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. चांगल्या शेंगा असतील तर त्याच्यातून 45 ते 50 टक्के तेल निघते. पण यंत्रामधून सर्वच तेल बाहेर येत नाही. लाकडी दाबयंत्र किंवा कोल्ड प्रेस पद्धतीतून 350 ते 420 मिलीलीटर तेल मिळते. एक्सपेलर पद्धतीतून 400-480 मिलीलीटर तेल मिळते.

तेल निघाल्यानंतर जी उरलेले पेंड असते ते जनावरांचे खाद्य किंवा सेंद्रिय खत म्हणूनही त्याचा वापर हा केला जातो.  शेंगदाण्याचे संपूर्ण मूल्य केवळ तेलातच नसते, त्याच्या टरफलातही असते. आपल्याला अनेक दुकानांमध्ये 50 ते 60 रुपयांना मिळणारे 250 मिली तेल पाहून धक्का बसतो. इतक्या कमी दरात तेल कसे विकले जाते. चला तर मग त्यामागील अगदी सोपी कारणे जाणून घेऊयात.

बाजारात विकली जाणारी सर्वच तेल शुद्ध असतात. कारखान्यांमध्ये या तेलाचे उत्पादन केले जाते. जास्त उत्पादन असेल तर प्रति लीटरवरील खर्च हा कमी होतो. तेल काढल्यानंतर त्याची पेंड विकली जाते, त्यातूनही पैसा मिळतो. त्यामुळे उत्पन्न ते फक्त तेलावरच अवलंबून नाही. मुळात म्हणजे मोठे कारखानदार थेट शेतकऱ्यांकडून भुईमुगाच्या शेंगा खरेदी करतात. ज्यामुळे स्वस्त मिळतात.

हजारो टनाची खरेदी शेतकऱ्यांकडून शेंगांची केली जाते, ज्यामुळे कच्च्या मालाची किमत कमी राहते. जास्त विक्री आणि नफा कमी असला तरीही उत्पन्न वाढल्याने थेट नफा अधिक मिळतो. लाकडी घाण्यातून तेल हळूहळू काढले जाते. त्याच्यावर रासायनिक शुद्धीकरण केले जात नाही, ज्यामुळे खर्च कमी होतो. एक किलो भुईमुगाच्या शेंगातून साधारणपणे 400 ते 450 मिलीलीटर तेल मिळते. बाजारात मिळणारे तेल शुद्धीकरण प्रक्रिया केलेले असते. लाकडी घाण्यातून काढलेले तेल खरे असते पण त्याचे प्रमाण कमी असते आणि खर्च अधिक असतो. त्यामुळे त्याची किमत अधिक असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
  • ‘सैराट’ फेम अरबाजच्या व्हिडीओनंतर तुकाराम मुंढे रुग्णालयावर कारवाई करणार का? नेटकऱ्यांचा सवाल
  • गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरमध्ये गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन व आर्थिक मदत
  • ती समजून घेण्याची गोष्ट… एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
  • IND vs ENG: तु मला लाईक करतोस मग…तरुणीचा श्रेयसबद्दल खळबळजनक दावा, इंग्लंडमधील व्हिडिओ जोरदार व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in