
देशभरात 42 कोटींहून अधिक ग्राहक एअरटेलचे सिम वापरतात. एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविध राज्यांतील ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लॅन्सही उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने नुकतेच लॉन्च केलेले हे नवीन प्लॅन्स ओडिशातील ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहेत.
पुरी येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी कंपनी वेगाने अपग्रेडेशनचे काम करत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांसह इतर राज्यांतून येणाऱ्या भाविकांनाही मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
एअरटेलने ओडिशातील प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी 399 रुपयांपासून सुरू होणारे नवीन पूर्णपणे अनलिमिटेड रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत. या प्लॅन्समध्ये कोणत्याही दैनंदिन डेटा मर्यादेशिवाय अनलिमिटेड 4G आणि 5G इंटरनेट, तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
या प्लॅन्समुळे ग्राहक डेटा संपण्याची चिंता न करता व्हिडिओ पाहू शकतील, फोटो आणि व्हिडिओ फाइल्स सहज शेअर करू शकतील. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक कामेही कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकतील.
दरम्यान, ग्राहकांच्या सोयीसाठी एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे. आता ग्राहकांना 28 दिवस, 30 दिवस, 56 दिवस, 60 दिवस, 77 दिवस, 84 दिवस आणि तब्बल 365 दिवस वैधता असलेले विविध रिचार्ज प्लॅन्स मिळणार आहेत.




Leave a Reply