
अनेकदा पाण्यात उकळायला ठेवलेली अंडी फुटतात. पाण्याचे तापमान वाढल्यामुळे अंडीच्या कवचावर दाब निर्माण झाल्याने फुटतात, असे सांगितले जाते.
उकळायला ठेवलेली अंडी फुटू नये, यासाठी पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे उकळत्या पाण्यातील अंड्यांचे कवच तडकण्यापासून वाचते. तसेच अंडी उकळल्यानंतर काही सेकंदात टरकलं काढू शकतात.
खरंतर रसातील सौम्य आम्लता पाण्यात मिसळली जाते. या पाण्यातील वाढलेल्या आम्लतेमुळे अंड्याचे कवच कडक राहते. त्यामुळे अंडी उकळताना कवच फुटण्याची शक्यता कमी होते.
तुम्ही एका भांड्यात अंडी उकळण्यासाठी ठेवली. त्यानंतर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर भांड्यातील अंडी मध्यम आचेवर उकळा. त्यामुळे अंडी फुटत नाही.
तुम्ही पाण्यात लिंबाचा रस घातल्याने अंडीवर काही परिणाम होत नाही. तर त्याच्या मूळ चवीवर काही परिणाम होत नाही. लिंबाच्या रसाचा परिणाम केवळ अंडीच्या बाहेरील कवचावर होतो.




Leave a Reply