
अमेरिका आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली होती, हे युद्ध तब्बल 39 दिवस चाललं, 40 व्या दिवशी अखेर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला. इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. हा युद्धविराम संपण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी देखील पाकिस्तानातच होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फोन केला होता. मात्र यावेळी त्यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात सुनावले आहे, जोपर्यंत तुम्ही स्ट्रेट ऑफ होर्मूजची नाकेबंदी उठवत नाहीत, तोपर्यंत इराणसोबत युद्धविरामाबाबतची चर्चा पुढे होऊ शकत नाही असं मुनीर यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. समजा इराण आणि अमेरिकेत युद्धविराम झालाच नाही आणि युद्ध सुरूच राहिलं तर त्याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसणार आहे. भारतामध्ये महागाईचा आगडोंब उसळणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण ऊर्जा क्षेत्रात जवळपास पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहोत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. आपण आपल्या एकूण गरजेच्या तब्बल 85 टक्के कच्च तेल इतर देशांकडून आयात करतो. त्यातील मोठ्या प्रमाणात तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा आपल्याला आखाती देशांकडून होतो. त्यामुळे जर समजा युद्ध सुरूच राहिलं तर भारताला सर्वात मोठा फटका हा ऊर्जा क्षेत्रात बसणार आहे. भारतामध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किंमती भविष्यात वाढू शकतात.
एका रिपोर्टानुसार ओमान, कतार, साऊदी अरेबिया आणि यूएई हे खतांचे सर्वात मोठे निर्यातदार देश आहेत. मात्र जर युद्ध सुरूच राहिलं तर या देशांमधून भारतात होणारा खतांचा पुरवठा ठप्प होऊ शकतो, त्यामुळे देशात खतांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच खाण्या-पिण्याच्या वस्तू देखील महाग होऊ शकतात. साबण निरमा यासारख्या प्रोडक्टच्या किंमती देखील वाढणार आहेत. काही कंपन्यांनी तर यापूर्वीच आपल्या वस्तूंचे दर वाढवले आहेत.
Leave a Reply