
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात आपली सक्रियता वाढवली आहे. त्यांच्या पुढाकाराने वरळी कोळीवाडा येथील प्रलंबित विकासकामांना गती मिळाली आहे. काल नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कोळीवाड्याच्या रहिवाशांनी काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करत, अवघ्या १२ तासांच्या आतच अधिकारी, इंजिनिअर आणि आर्किटेक्टचे एक पथक वरळी कोळीवाड्यामध्ये पोहोचले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
स्थानिकांच्या समस्या आणि मागण्यांना त्वरित प्रतिसाद देत, प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यामुळे कोळीवाडा परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. एका लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघात दुसऱ्या लोकप्रतिनिधीने विकासकामांसाठी घेतलेला हा पुढाकार लक्षवेधी ठरला आहे. ही जलद कार्यवाही लोकप्रतिनिधींच्या जनसामान्यांच्या कामाप्रती असलेल्या कटिबद्धतेचे दर्शन घडवते.
Leave a Reply