• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आज जीआर हाती नाही दिला तर… मांजरीत 600 आदिवासी विद्यार्थ्यांचा अल्टिमेटम, काय दिला इशारा?

August 28, 2026 by admin Leave a Comment


पुण्याजवळील मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 16 दिवसांपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती परवा खालवली होती. मंत्री नरहरी झिरवळ यांनी त्यांना खाऊन-पिऊन उपोषणाचा सल्ला दिल्याने विद्यार्थी नाराज झाले. त्यांच्या आंदोलनाला उलट धार चढली. आज विद्यार्थ्यांनी सरकारला मोठा अल्टिमेटम दिला आहे. आता सामूहिक उपोषणाचा विद्यार्थ्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारपुढे पेच वाढणार आहे.

तोगडा निघणार कधी?

आता आंदोलन तिसऱ्या आठवड्यात पोहचले आहे. पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही मागण्यांबाबत तडजोड होताना दिसली. मंत्री नरहरी झिरवळ, मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना सबुरीचा सल्ला दिला. पण सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नसल्याची ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या आंदोलनाला नागपूरसह इतर शहरातूनही प्रतिसाद मिळत आहे. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. आंदोलनकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

600 विद्यार्थ्यांचे सामूहिक आमरण उपोषण

सरकार न्याय मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आदिवासी विद्यार्थीही ईरेला पेटले आहेत. सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात आणि तोडगा काढवा अशी विनंती त्यांनी केली आहे. आता आंदोलनाचा पुढचा टप्पा विद्यार्थ्यांनी आज जाहीर केला. त्यानुसार, मांजरी येथील 600 विद्यार्थी सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या या पावित्र्यानंतर सरकारसमोर पेच वाढला आहे. आज संध्याकाळपर्यंत हे विद्यार्थी सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहणार आहेत. त्यानंतर सर्वांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका आंदोलकाने दिली.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?

शहरांच्या मध्यवर्ती भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावेत

आदिवासी वसतिगृहाबाबत यावर्षी घेतलेला निर्णय रद्द करावा

प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी

विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेतंर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करावी

2011 मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी

शिल्लक 12 हजार 500 पदांची भरती करावी

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gunratna Sadavarte on Manoj Jarange : जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस, सदावर्तेंचा आरोप
  • 17 वर्षानंतर ट्रेंट बोल्टच्या क्रिकेट कारकि‍र्दीत पहिल्यांदाच असं घडलं, 316 सामन्यानंतर इच्छा पूर्ण
  • महाराष्ट्राच्या राज्यपालांनी स्वीकारली BAPS ची आशीर्वादाची राखी
  • क्रिती नंतर आता सेलिना जेटली निशाण्यावर, रक्षाबंधन लूकवरून गदारोळ ! डीपनेक ब्लाऊज घातल्याने भडकले नेटकरी
  • वंदेभारत स्लीपरच्या मास प्रोडक्शनला होणार आणखी उशीर, डेडलाईन पुढे ढकल्याने चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in