• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

July 22, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्त दादांना वेगवेगळ्या स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दादांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अनेकांनी अजित दादांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली होती. सध्या या अपघाताचा तपास यंत्रणांमार्फत तपास सुरू आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपात होता असं विधान केले आहे. जाधव यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

भास्कर जाधव यांचे खळबळजनक विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाताबाबत आमदार भास्करराव जाधव यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्या अपघात हा साधा अपघात नसून तो घातपात होता, असा दावा त्यांनी केला आहे. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी भास्करराव जाधव यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही भरभरून कौतुक केले. ‘अजितदादा म्हणजे कठोर शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि निर्मळ मनाचा राजा माणूस आहेत. प्रशासन आणि राजकारणात त्यांनी वेगळी कार्यशैली निर्माण केली असून, अनेक कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्थान आहेत,’असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

नीट पेपरफुटीवरही भाष्य

भास्कर जाधव यांचे व्हाट्सअप स्टेटस देखील चर्चेत आहे. भास्कर जाधव यांनी स्टेट्समध्ये म्हटले की, ‘सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणं सोपं आहे; पण स्वतःच्या कृतीकडे पाहणं कठीण होईल काही जणांना. पेपर लीक करणारे दोषी आहेतच पण तोच पेपर विकत घेणारे निर्दोष कसे? जोपर्यत “मला फक्त यश हवं, ते कसंही मिळालं तरी चालेल ” ही मानसिकता जिवंत आहे, तोपर्यत पेपर लीक थांबणारच नाहीये. मंत्री बदलतील, अधिकारी बदलतील, व्यवस्था बदलेल… पण नैतिकता बदलली नाही तर ?? भ्रष्टाचार नव्या चेहन्यांने पुन्हा उभा राहील. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.

देश बदलायचा असेल तर…

नैतिकतेशिवाय कोणतीही क्रांती अपूर्ण असते. पोस्टर, स्टेटस आणि हॅशटॅगने समाज बदलत नाही; समाज बदलतो तो प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारलेल्या एका प्रश्नाने “मी स्वतः प्रामाणिक आहे का?” पेपर लीक करणान्यांइतकाच तो विकत घेणान्यचाही गुन्हा आहे. कारण भ्रष्ट व्यवस्थेला बळ देणारे हात फक्त विकणाऱ्यांचे नसतात, तर विकत घेणाऱ्यांचेही असतात. देश बदलायचा असेल तर आधी स्वतःची नैतिकता बदला. अन्यथा आंदोलनांना पाठिंबा देणं ही फक्त दिखाऊ देशभक्ती ठरेल.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in