• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली

September 12, 2026 by admin Leave a Comment


वाशिम जिल्ह्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, तूर आणि कपाशी या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्याच्या कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव आणि वाशिम तालुक्यांमध्ये पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पावसाअभावी सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे भांडवल वाया गेले आहे.

मालेगाव तालुक्यातील पांढरी धनकुटे येथील एका महिला शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना डोळ्यात अश्रू आणले. चार एकर सोयाबीन पेरणीसाठी एकरी २५ हजार रुपये खर्च आला, मात्र आता काहीच हाती लागणार नाही अशी त्यांची भावना आहे. लेकराबाळांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तातडीने एकरी २५ हजार रुपये किंवा हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
  • ‘सोन परी’ची फ्रूटी म्हणून गाजली, आता अभिनयाला ब्रेक; ती सध्या काय करते?
  • ‘तुम्ही डान्समध्ये झिरो आहात’, कतरिनाला या कोरिओग्राफरने दिलेला डान्स सोडण्याचा सल्ला, नंतर तिने…
  • माजी मुख्यमंत्र्यांची आधी पक्ष सोडण्याची तयारी, नंतर घेतला यु-टर्न; आता म्हणाले…
  • Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in