
मुंबई महानगरपालिकेच्या सभेत महापौर रितू तावडे यांनी ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द केल्याची घोषणा केली आहे. राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
या कारवाईनंतर विशाखा राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या सध्या या प्रकरणी कायदेशीर मार्गांचा अवलंब करत आहेत. राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेने या प्रकरणावर तातडीने कारवाई केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. इतर कामांसाठी वेळ लावणारे प्रशासन आपल्या बाबतीत मात्र जलद गतीने पुढे सरसावले, असे त्यांचे म्हणणे आहे. यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. काही महिन्यांपासूनच त्यांच्या अपात्रतेबद्दल चर्चा सुरू होती, तसेच काही विशिष्ट व्यक्तींकडून याबद्दल भाकीत केले जात होते, असेही त्यांनी नमूद केले. आयुक्तांनीही या प्रकरणात जलद कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Leave a Reply