• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

July 22, 2026 by admin Leave a Comment


Delhi CJP Protest : कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे दिल्लीतील आंदोलन चांगलेच पेटले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी, तरुण जंतर मंतरच्या मैदानावर जमा झाले आहेत. काहीही झालं तरी आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेणारच, अशी सीजेपीने ठाम भूमिका घेतली आहे. काँग्रेस, ठाकरे, गट, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी अशा विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, आता या महाराष्ट्र बंदचे नियोजन कसे आहे? तसेच या बंदला कोणी-कोणी पाठिंबा दिला. याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदवर सविस्तर भाष्य केलं. सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनांला एवढं घाबरलं आहे की आता केंद्र सरकारने टेरीटोरीयल आर्मी तैनात केली आहे. आमच्या बंदला डाव्या पक्षांनी पाठिबा दिला आहे. शिक्षण संस्थांनीही आमच्या बंदला पाठिंबा दिलाय. राज्यातील कोचिंग क्लासेसही आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाला

तसेच, हा बंद यशस्वी व्हावा यासाटी कामगार संघटना, बेस्ट संघटना, बीएमसीच्या संघटना, व्यापारी संघटनांशी आमचे बोलणे सुरू आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये चीड आहे. अनेक संघटना महाराष्ट्र बंदमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

भाजप सोडून सर्व पक्षांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावं

दिल्लीतील आंदोलन चिरडण्यासाठी काश्मीर येथील राखीव बलही बोलवण्यात आलंय. सरकारच्या या धोरणाला आमचा विरोध आहे. सरकारने आंदोलकांवर अश्रूधूर सोडू नये, लाछीचार्ज करू नये यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आम्ही भाजप सोडून सर्व पक्षांना महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. या बंदमध्ये प्रत्येकानेच सहभागावी व्हावं. आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत, हे सांगितले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

23 तारखेचा महाराष्ट्र बंद हा होणारच

नवीन पिढी घडण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. शासनाला जरब बसली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप शासनाचा काहीही निर्णय आलेला नाही. त्यामुळे 23 तारखेचा महाराष्ट्र बंद हा होणारच आहे. राहुल गांधी यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करावं, असं माझं मत आहे. हे आंदोलन आमचं नाही. भाजपच्या विद्यार्थी संघटनेनेही सहभागी व्हावं, असही आंबेडकर यावेळी म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange: मनोज जरांगे यांचा एल्गार, आमरण उपोषणापूर्वी सरकारची मोठी भूमिका, अखेर तो डाव टाकलाच…
  • Manoj Jarange: भगवं वादळ मुंबईत धडकणार, किती मराठे राजधानीत येणार? मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला, सरकारपुढे मोठे आव्हान
  • सनी देओल याने मुस्लीम भूमिका साकारल्यानंतर काय झालं? ‘बंटवारा 1947’ सिनेमा फ्लॉप होताच, शबाना आझमी यांचा रोखठोख प्रश्न…
  • भर शोमध्ये ओरीने समय रैनाला दिली अटकेची धमकी, दोघांमध्ये नेमकं काय घडलं?
  • रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाके यांचा गौप्यस्फोट; मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in