• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastushastra : या वस्तू दान करणं म्हणजे महापुण्य, सर्व कष्ट होतात दूर, घरात येते आर्थिक स्थिरता

May 25, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व आहे. तसेच वास्तुशास्त्रात देखील दानाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण गरजू व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं दान करतो, तेव्हा आपल्याला पुण्य तरच मिळतंच परंतु त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जसं की काहीही कारण नसताना घरात कलह वाढतो, पती-पत्नीचं पटत नाही. एवढंच नाही तर घरात आर्थिक स्थिरता नसते, हातात आलेला पैसा लगेच खर्च होतो. परंतु तुम्ही जेव्हा दान करतात, तेव्हा तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात, आणि पितृदोष दूर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच वास्तुशास्त्रात कोणत्या वारी काय दान करावं? याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं कय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

मीठ दान करा – वास्तुशास्त्रानुसार जीथे देवाचा भंडारा होतो, तिथे मीठ दान करावं. भंडाऱ्यामध्ये मीठ दान केल्यास तुमच्या घरात कधीही अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण होत नाही, घर सतत अन्न धान्याने भरलेलं राहतं. तुमच्या घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होते. प्रगतीच्या नवीन संधी मिळतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे भंडाऱ्याच्या ठिकाणी मीठ दान केलं पाहिजे.

मंदिरात दिवा दान करा – जर काहीही कारण नसताना तुमच्या घरात साखरे भांडण होऊ लागले, पती-पत्नीचं पटत नसेल तर यावर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे मंदिरात दिवा दान करावा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. तसेच तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी येते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

मंगळवारी माचिस दान करा – जर तुमच्या आयुष्यात काही कष्ट असतील, तर अशावेळी मंगळवारी माचिस दान करावी, यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आसन दान करा – जर तुमच्या मनाला शांतता लाभत नसेल, तुम्ही कुठेही एका जागी स्थिर नसाल, म्हणजे नोकरी सतत बदलण्याची वेळ तुमच्यावर येत असेल. घरात आर्थिक स्थैर्य नसेल तर अशावेळी मंदिरात आसन दान करावं, यामुळे या सर्व समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : विकासनिधीवरुन सरकारवर होणारा मोठा आरोप स्वत: राऊतांनीच काढला खोडून
  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in