• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi: वैभवनं फक्त 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तरीही भलताच खेळाडू ठरला सामनावीर, असं का?

July 24, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु असून पहिला सामना काल रंगला जो भारतीय संघाने जिंकला. मागील काही महिन्यातील भारतीय संघाची टी-ं20 मथील कामगिरी पाहता झिम्बाब्वेविरुद्धही मालिका चांगली जाईल की नाही असा प्रश्न होता पण भारतीय संघाने अखेर कमबॅक केला. श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणूनही पहिला सामना जिंकता आला. वैभव सूर्यवंशीकडे विशेष लक्ष होते. आता वैभवने पण कमाल केली आहे. हरारे क्रिकेटचे मैदान वैभव सूर्यवंशीसाठी पुन्हा एकदा शुभ ठरले. भारतीय क्रिकेटमधील या सर्वात तरुण खेळाडूने याच मैदानावर इतिहास रचला. यजमान झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात, वैभवने अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून भारतीय संघाचा विजय निश्चित केला. असे असूनही, त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले नाही. असं का झालं कारण जाणून घ्या…

सुमारे पाच महिन्यांपूर्वी, हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक  2026 च्या अंतिम सामन्यात, वैभवने अवघ्या 80 चेंडूंमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी केली होती. त्या स्फोटक आणि सामना जिंकवून देणाऱ्या खेळीनंतर, वैभवने याच मैदानावर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले. झिम्बाब्वेच्या  126 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, वैभवने अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले, जे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. यासोबतच, तो टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाजही ठरला.

टीम इंडियाचा सलामीवीर वैभव यादवने 19 चेंडूंमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह 50 धावा केल्या. असे असूनही, टीम इंडियाच्या विजयानंतर त्याला सामनावीर म्हणून घोषित न करता, वेगवान गोलंदाज मयंक यादवला हा पुरस्कार देण्यात आला.  याचे कारण म्हणजे मयंकची भेदक गोलंदाजी, ज्यामुळे झिम्बाब्वेला सावरण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटक गोलंदाज मयंक यादव जवळपास 650 दिवसांनंतर भारतीय संघात परतला. त्याचा शेवटचा सामना ऑक्टोबर 2024 मध्ये झाला होता. त्यानंतर दुखापतींमुळे तो अनेक वेळा संघाबाहेर होता. पण हरारेमध्ये टीम इंडियाने गोलंदाजी सुरू करताच आणि मयंकने सामन्याचा पहिला चेंडू टाकताच, त्याने झिम्बाब्वेला चकित केले. त्याने पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेटला बाद केले. त्यानंतर, आपल्या तिसऱ्या षटकात त्याने दुसरी विकेट घेत झिम्बाब्वेला अडचणीत आणले.

सतत ताशी सुमारे 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयंकवर मात करणे झिम्बाब्वेच्या फलंदाजांसाठी कठीण ठरले. आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये मयंकने केवळ 18 धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, मयंकने 24 चेंडू टाकले आणि त्यापैकी 17 चेंडूंवर एकही धाव काढता आली नाही. या जबरदस्त गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेचा डाव केवळ 125 धावांपर्यंतच पोहोचला आणि भारताने सहज विजय मिळवला, ज्यात वैभवनेही योगदान दिले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in