• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Uddhav Thackeray: बंगालमध्ये वाघीण एकटीच लढतेय…उद्धव ठाकरेंच्या त्या भाषणाने भाजपला झिणझिण्या, महिला आरक्षणावरून काढले वाभाडे

April 21, 2026 by admin Leave a Comment


Uddhav Thackeray Over Mamata Banerjee: महिला आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे तुटून पडले. नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयकाआडून देश तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव होता आणि तो विरोधी पक्षांनी उधळवून लावल्याचा दावा केला. त्यांनी डिलिमिटेशनवरून भाजपला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी सर्व मलाच पाहिजे या हव्यासाची वखवख सुटल्याचा टोला पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला. पक्ष निष्ठा काय असते हे त्यांनी दत्ता साळवी यांचं उदाहरण देऊन सांगितलं. तर त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी एकटीच लढत आहे. त्यांनी निवडणूक जिंकलीच पाहिजे असे मोठे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा रोख भाजपकडे होता. भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर आणि सरकारच्या धोरणावर जाहीर टीका केली.

नोकरीची राजीनामा देऊन दत्ता साळवी शिवसेनेत

दत्ताजी यांचं नाव मी मुद्दाम घेतो ते घ्यायलाच पाहिजे यात काहीही वाद नाही. १९ जुन १९६६ साली शिवसेनेची सुरुवात झाली. आम्ही तेंव्हा दादरला रहायचो. दत्ता साळवी तेंव्हा बाळासाहेबांना भेटायला आले होते आणि नोकरीचा राजीनामा देऊन बाळासाहेबांच भाषण ऐकून आले होते. नोकरी सोडून तुम्ही इकडे कशाला आला आहात असे बाळासाहेबनी त्यांना विचारल होत. पण दत्ता साळवी यांनी नोकरी सोडून हजारो कामगारांच्या आयुष्यात उजेड आणला. शिवसेनाप्रमुखांची हीच शिकवण आहे धाडस महत्वाचं. सोडून जाताय जा पण गेल्यानंतर जे गेलेत त्यांचे अनुभव ऐका की बाबा तुझी काय अवस्था आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ५८ वर्षात कामगार सेनेच्या एकही कामगाराची आपण फसवणूक केलेली नाहीये करणार नाही.

आता वेगवेगळी दुकान उघडली जातायत. ५८ वर्षे शिवसेना या क्षेत्रात काम करते आहे. या क्षेत्रात एवढा वेळ नेतृत्व करणे म्हणजे येड्यागबाळ्याच काम नाही. युनियन तोडायची आणि मालकाच्या दावणीला बांधायची. मालक म्हणेल तिकडे मग जावं लागत नाहीतर घरी बसाव लागत. सगळ्याच कंपन्या, उद्योग आणि हॉटेलमध्येही आपल्या युनियन आहेत. प्रत्येक गेटवर असणाऱ्या भगव्याशी माझ नात आहे कुठल्याही मालकाशी नाही एवढा मी प्रखर आहे, असे ठाकरे म्हणाले.

दुबईमध्ये अनेक उत्तर भारतीय तिकडे काम करतायत. त्यांना हल्ल्यादरम्यान सरकारने सांगितलं की परत या परत या.
तिथल्या कामगारांनी सांगितल आम्ही परत येऊन बेकारीने मरण्यापेक्षा इथे काम करता करता मरु. आजवर जे जे लढे झाले त्या सगळ्या लढ्यांमध्ये कामगार उतरला नसता तर स्वातंत्र्यही उशीरा मिळाल असत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढही सुरू झाला नसता असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे…



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉपलेस सीन देऊन या अभिनेत्रीने उडवली होती खळबळ, 61 व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत केलं लग्न
  • Tim Cook: CEO म्हणून नाही तर शेअरमुळे नवकोट! ॲप्पलचे सीईओ टिम कुक हे इतक्या संपत्तीचे धनी
  • आशा भोसले यांची नात जनाईने पूर्ण केली आजीची अखेरची इच्छा
  • Sushma Andhare Full Press | महिला आरक्षणावरून 2023 ट्विट्सचा दाखला देत अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल; राजीनामा द्यायला तयार आहात का?
  • Pahalgam | Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दिलासा; पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in