• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला पराभूत केल्याने अंतिम फेरीचा मार्ग किचकट, आता जर तर आणि…

June 15, 2026 by admin Leave a Comment

ट्राय नेशन ए सिरीज 2026 स्पर्धेत तीन संघात अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी लढत सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात या स्पर्धेतील सातवा आणि संघांचा तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्व गडी गडी गमवून 265 धावा केल्या आणि विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं. पण या सामन्यात विपरज निगमने केलेल्या चुकीमुळे 10 धावांचं नुकसान झालं आणि फुकटच्या 10 धावा श्रीलंकेला मिळाल्या. खेळपट्टीच्या मधून धावल्याने पंचांनी 10 धावांची पेनल्टी दिली. त्यामुळे श्रीलंकेची सुरूवात विना बाद 10 धावांनी झाली. त्यात हा सामना शेवटच्या षटकात बॉल टू बॉल आला होता. त्यामुळे धाव किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येत होता. अखेर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारताने हा सामना गमावला. भारताला सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघ 9 धावा करू शकला आणि 7 धावांनी सामना गमावला.

भारतासाठी करो या मरोची लढाई

भारताचा चौथा आणि शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई ठरणार आहे. श्रीलंकेने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं तर भारताला अंतिम फेरीची सहज संधी मिळेल. म्हणजेच भारताला अफगाणिस्तानला काहीही करून पराभूत करावं लागेल. त्यानंतर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. पण अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत केलं तर मात्र जर तर वर येईल. भारताला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकवा तर लागेलच. वरून नेट रनरेटचं गणित सोडवावं लागेल. कारण या स्थितीत तिन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील. त्यामुळे अंतिम फेरीचं तिकीट नेट रनरेटच्या आधारावर ठरेल.श्रीलंकेचे 4 गुण आणि नेट रनरेट हा +0.494 आहे. तर भारताचे 2 गुण असून नेट रनरेट +0.032, तर अफगाणिस्ताने 2 गुण आणि नेट रनरेट हा -1.392 आहे.

भारताचा चौथा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 17 जून रोजी होणार आहे. हा सामना भारताला काहीही करून जिंकवाच लागणार आहे. अन्यथा या स्पर्धेतून आऊट होईल. भारताने हा सामना जिंकल्यानंतर श्रीलंका अफगाणिस्तान सामन्यावर लक्ष ठेवावं लागेल. हा सामना 19 जूनला होणार आहे. हा सामना श्रीलंकेने जिंकला तर भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. पण अफगाणिस्तानने जिंकला तर मात्र सर्व गणित नेट रनरेटवर येईल. त्यामुळे या दोन्ही सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. अंतिम फेरीचा सामना 21 जून रोजी होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
  • अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली
  • India-UAE Defence Deal : अमेरिका असमर्थ ठरली म्हणून भारताकडे आले पण भारतही तो पर्यंत UAE ला ब्रह्मोस नाही विकू शकणार
  • Ketan Agarwal Death : मला का सोडून गेलास ? केतन अग्रवालच्या हत्येनंतर अटक, सिया गोयलची भावनिक पोस्ट पुन्हा चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in