
टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यात 2 कसोटी आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी चाहत्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. (Photo Credit : PTI)
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात ऑगस्ट महिन्यात कसोटी आणि टी 20i मालिका प्रस्तावित आहे. या मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20i मालिका होणार नाही. (Photo Credit : PTI)
रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20i मालिका रद्द होऊ शकते. उभयसंघातील मालिकेबाबत बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा झाली. मात्र आता मालिका होणं अवघड असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)
टीम इंडिया पुढील काही महिने सातत्याने क्रिकेट सामने खेळणार आहे. टीम इंडिया जुलै महिन्यात झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (Photo Credit : PTI)
श्रीलंकेत गेल्या वर्षी आलेल्या वादळामुळे फार नुकसान झालं होतं. त्यानंतर बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात पीडितांना मदत होईल या उद्देशाने टी 20i मालिकेचं आयोजन करण्याचं ठरलं होतं. मात्र आता उभयसंघात टी 20i मालिका होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)




Leave a Reply