• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs BANW : शफाली वर्माचं चाबूक अर्धशतक, टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 5 विकेट्सने धुव्वा

June 25, 2026 by admin Leave a Comment

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतली आहे. टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 23 व्या सामन्यात बांगलादेशवर मात करत 2 गुणांची कमाई केली आहे. बांगलादेशने टीम इंडियासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान ओपनर शफाली वर्मा हीच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज आणि सुरक्षितपणे पूर्ण केलं. शफालीला तिच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं. भारताचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. भारताने या विजयासह बाद फेरीतील आपला दावा आणखी मजबूत केला आहे. टीम इंडियाने 137 धावांचं आव्हान हे 5 विकेट्स राखून 19 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 16.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 139 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम राखलं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ITR चा रिफंड किती दिवसांत खात्यात येतो? करदात्यांसाठी प्राप्तीकर विभागाचे नवीन अपडेट
  • मोठी बातमी! केतन अग्रवाल प्रकरणात थेट राज्य सरकारची एन्ट्री, विधानसभेत मोठी घोषणा
  • IRE vs IND : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण होणार?
  • Monsoon update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये नदी नाले एक होणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
  • अर्शदीप सिंग आणि समरीन कौर यांचं ब्रेक झाल्याच्या चर्चांना उधाण! अखेर खरं काय ते समोर आलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in