
आनंदाची बातमी आहे, तळकोकणात अडकून बसलेला मान्सून अखेर तळकोकणातून बाहेर पडला आहे. आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापून टाकला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील काही दिवस म्हणजे 26 जून ते 30 जून या कालावधीमध्ये राज्यात दमदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तवण्यात आला आहे. या सर्वा पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा देखील मान्सून अंदाज समोर आला असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
काय आहे नवा अंदाज?
पुढील पाच दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, 26 जुन ते 30 जुन या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये अजूनही चांगला पाऊस झालेला नाही तिथे देखील चांगला पाऊस होईल, शेतकऱ्यांनी चिता करू नये, सर्वांच्या पेरण्या होणार आहेत. राज्यात पुढील काही दिवस चांगला पाऊस होणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. येत्या 26 ते 30 जूनपर्यंत पश्चिम महाराष्ट्र, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा मराठवाड्यात बीड, लातूर, या पट्ट्यांमध्ये चांगला पाऊस होणार आहे, असं डख यांनी म्हटलं आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीचा इशरा
दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा डख यांनी दिला आहे. या काळात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून, काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होईल असं डख यांनी म्हटलं आहे. तसेच यंदा राज्यता दुष्काळ पडणार नाही, राज्यात परतीचा पाऊस जोरदार होणार आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. फक्त शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यावी, जर एक इतिपेक्षा जास्त ओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा शेतात चांगली ओल होण्याची वाट पहावी असं आवाहानही डख यांनी केलं आहे.
Leave a Reply