• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 Mumbai 2026 Final: अंतिम सामना सुरू असताना मैदानात राडा, अर्जुन तेंडुलकरच्या संघासोबत काय झालं?

June 15, 2026 by admin Leave a Comment

टी20 मुंबई 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मराठा रॉयल्स आणि आर्क्स अंधेरी यांच्यात लढत झाली. आर्क्स अंधेरीने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मराठा रॉयल्स संघाने 20 षटकात पाच गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही आर्क्स अंधेरीला गाठता आलं नाही आणि 20 षटकात 8 गडी गमवून 146 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना आर्क्स अंधेरीने 8 धावांनी गमावला. हा सामना अतितटीचा झाला आणि शेवटच्या चेंडूवर या सामन्याचा निकाल लागला. अर्जुन तेंडुलकर खेळत असलेला आर्क्स अंधेरी संघ 8 धावांनी पराभूत झाला. या सामन्याचा निकाल मराठा रॉयल्सच्या बाजूने लागला असला तरी या सामन्यादरम्यान बराच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अंतिम सामना जिंकण्याचा दबाव खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यात दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी भिडले.

शेवटच्या षटकात 14 धावांची गरज आणि…

टी20 मुंबई लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या षटकात आर्क्स अंधेरीला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. मराठा रॉयल्सकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी रोहन राजे आला. त्याने या षटकात फक्त 5 धावा दिल्या आणि विजयी जल्लोष साजरा केला. विजय झाल्यानंतर रोहन राजेने जर्सी काढली आणि मैदानावर धावून लागला. मराठा रॉयल्सचे इतर खेळाडूही रोहन राजेच्या आनंदात सहभागी झाले. पण या विजयापूर्वी तुषार देशपांडे आणि गौरव जठार यांच्यात वाद झाला. त्यामुळे डगआऊटमधून धावत येत अंधेरीचा कर्णधार शिवम दुबेने हे प्रकरण शांत केलं. तसेच गौरव जठारला बाजूला घेऊन गेला.

Big fight in t20 Mumbai final!!

– Shivam Dube to rescue.🤯 pic.twitter.com/niaNJntnpM

— Cricket Central (@CricketCentrl) June 14, 2026

 

View this post on Instagram

 

A post shared by T20 Mumbai (@t20mumbai)

आर्क्स अंधेरीला 18 चेंडूत 38 धावांची गरज होती. मैदाताना शिवम दुबे आणि गौरव जठार होते. 18 वं षटक टाकण्यासाठी तुषार देशपांडे आला आणि त्याने 13 धावा देत शिवम दुबेची विकेट काढली. त्यानंतर 12 चेंडूत 25 धावा अशी स्थिती आली होती आणि 19वं षटक टाकण्यासाठी इरफान उमेर आला होता. त्याने या षटकात 11 धावा देऊन दोन विकेट काढल्या. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने गौरव जठारची विकेट काढली. जठार डगआऊटमध्ये जात असताना वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि गौरव जठार यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. पण हे प्रकरण पंच आणि खेळाडूंनी तात्काळ सोडवलं.

अर्जुन तेंडुलकरची कामगिरी

अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात आर्क्स अंधेरीकडून पाचपैकी दोन बळी घेतले. त्याने चार षटकांत 36 धावा देत मराठा रॉयल्सचा सलामीवीर मधुकर यादव आणि मधल्या फळीतील फलंदाज अयाझ खान यांना बाद केले. फलंदाजीत अर्जुन काही खास करू शकला नाही. त्याने 12 चेंडूत फक्त 2 धावा केल्या आणि बाद झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
  • अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली
  • India-UAE Defence Deal : अमेरिका असमर्थ ठरली म्हणून भारताकडे आले पण भारतही तो पर्यंत UAE ला ब्रह्मोस नाही विकू शकणार
  • Ketan Agarwal Death : मला का सोडून गेलास ? केतन अग्रवालच्या हत्येनंतर अटक, सिया गोयलची भावनिक पोस्ट पुन्हा चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in