
नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात आवाज उठवत 26 दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते, सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारने परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचं स्वागत केलं आहे. राजधानी दिल्लीतील आंदोलनानंतर काश्मीरमध्ये एक दिवस विश्रांती घेत ते लडाखकडे रवाना झाले. यावेळी वांगचुक यांनी संसदेत पेपर लीकविरोधात विधेयक मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केलं . तसेच परीक्षा व्यवस्थेबरोबरच संपूर्ण शिक्षण प्रणालीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. वांगचुक यांनी सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या चर्चेनुसार आणि दिलेल्या आश्वासनांप्रमाणे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारने देशातील विशेषतः तरुणांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन वांगचुक यांनी केलं.
जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनात उपोषण करणारे सोनम वांगचुक हे आंदोलनाचे प्रमुख चेहरा ठरले होते. 18 जुलै रोजी त्यांना जंतर-मंतरवरून जबरदस्तीने हटवन रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर, लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि आंदोलनाला पुन्हा वेग आला. या घडामोडींनंतर केंद्र सरकारवर दबाव वाढला. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वीच वांगचुक यांनी सरकारकडून काही आश्वासनं मिळाल्यानंतर आपले उपोषण संपवलं होतं.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply