
आयसीसी टी 20i वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्याचा निकाल लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर करो या मरो सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. दक्षिण आफिकेने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे दुसरा विजय मिळवला.मारिजान काप ही दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची शिल्पकार ठरली. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवलं आहे. तर भारताचा हा सलग 2 विजयानंतर पहिला पराभव ठरला. मारिजान काप हीने केलेल्या नाबाद खेळीसाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारने गौरवण्यात आलं.
Leave a Reply