
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. अर्थखात्यावरून महायुतीत अनेक चर्चा सुरू असून त्यावरून बरीच अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाणार का, इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या होत्या. या बद्दल सुरू असलेली कुजबूज शमते ना शमते तोच काल पुन्हा जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नंदनवन या निवासस्थानी दोन्ही नेते शिंदे यांना भेटले, त्यामुळे राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. आधी मुख्यमंत्री, मग उपमुख्यमंत्री. या दोघांची जयत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे मविआमध्येही सगळं आलबेल ना, असा प्रश्न अनेकांना पडला असून जयंत पाटील यांच्या याच भेटीच्या मुद्यावरून मविआतील नेते, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
शिंदे- जयंत पाटील यांची भेट, राऊत म्हणाले उद्या जर..
त्यावरून राऊत यांनी दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे. ज्या लोकांचं तुम्ही आत्ता नाव घेतलंत, उद्या हेच लोकं जर रामदास आठवलेंना भेटले, तर ते आठवले यांच्या पक्षात जात आहेत, असं तुम्ही म्हणणार का? असा खोचक सवाल राऊतांनी विचारला. या महाराष्ट्रात आणि देशात इतके राजकीय पक्ष आहेत, कोणी ना कोणी, कोणाची तरी भेट घेतच असतं ना. त्याचा अर्थ पक्षात गेले, दुसरे या पक्षात आले, असा होत नाही. जयत पाटील असोत किंवा जितेंद्र आव्हाड असोत, ते सर्व पक्षाच्या नेत्यांची भेट घेत असतात, ते फ्री बर्ड्स आहेत, भेटू देत असं म्हणत राऊतांनी या मुद्यावरून कोणताही प्रश्नच नसल्याचा सूचक इशारा दिला.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply