
Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त याचं आयुष्य कधीचा साधं राहिलेलं नाही. अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, ज्यामुळे देशात खळबळ उडाली. म्हणूनच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याचा निर्णय घेताला. सिनेमात संजय याच्या आयुष्यात अमली पदार्थ, बंदुका, तुरुंगवास, प्रेमसंबंध आणि पालकांसोबतचे गुंतागुंतीचे नाते अशा अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला… एवढंच नाही तर, एका मुलाखतीत अभिनेत्याने स्वतःच्या आयुष्याबद्दल मोठं सत्य सांगितलं. त्यांच्या आयुष्यातील ती दोन वर्ष, जी त्याने रिहॅब सेंटरमध्ये घालवली… तेव्हा संजय याला त्याने केलेल्या चुकांचा अनुभव झाला आणि नव्याने अभिनेत्याने आयुष्याची सुरुवात केली.
संजय दत्त म्हणाला, ‘तो माझ्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट होता. एका सकाळी मी उठलो आणि आरशात स्वतःला पाहिलं… तेव्हा मला असं वाटलं मी मरत आहे. माझा चेहरा काही वेगळाच झालेला. त्यामुळे मी तेव्हा माझे वडील सुनील दत्त यांच्याकडे गेलो आणि त्यांनी माझी मदत केली. मी त्या लोकांचे आभार मानेल ज्यांनी मला अमेरिकेच्या रिहॅब सेंटरमध्ये पाठवलं… त्या रिहॅब सेंटरमध्ये मी दोन वर्ष राहिलो…’
रिहॅब सेंटरमधील दिवस आठवत अभिनेता म्हणाला, ‘त्या दोन वर्षांत मी काउन्सलरसोबत बाहेर जायचो, सरोवराच्या काठावर जायचो आणि बार्बेक्यूचा आनंद घ्यायचो. मी अधिक मोकळेपणाने बोलायला लागलो, माझा स्वभावही अधिक बोलका झाला. मी सिनेमांबद्दल आणि इतर अनेक गोष्टींबद्दल गप्पा मारायचो. तेव्हा मला वाटलं, ‘मी ही इतकी वर्षे का वाया घालवली? त्या सुंदर सरोवराचा आनंद घेण्याऐवजी, बार्बेक्यू करण्याऐवजी, महामार्गावर मॅराथॉन धावण्याऐवजी किंवा सायकल चालवण्याऐवजी… मी काहीतरी वेगळंच करत होतो. तेव्हा मी स्वतःलाच म्हणालो, मला असं आयुष्य जगायचं आहे… जे आयुष्य मी जगत होतो, ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती…’
मुंबई बॉम्बब्लॉस्ट प्रकरणी काय म्हणाला संजय दत्त?
संजयने त्याच्या आयुष्यातील आणखी एका वादळी पर्वाबद्दल देखील सांगितलं. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत अभिनेत्याला कारावासाची शिक्षा झालेली. ती वेळ आठवत अभिनेता म्हणाला, ‘माझ्या वडिलांना धमकावलं जात होतं, माझ्या बहिणींना धमक्या दिल्या जात होत्या. माझ्याकडे बंदूर आहे, पण ही गोष्ट ते साध्य करु शकले नाहीत… त्यामुळे मला माहिती नव्हतं मला का कैद केलेलं…’
पुझे अभिनेता म्हणाला, ‘मी एवढंच म्हणू शकतो की, ‘टाडा’ कायद्यांतर्गतच्या खटल्यात किंवा बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात माझा काहीही सहभाग नव्हता, हे समजायला त्यांना 25 वर्षे लागायला नको होती. हे समजायला त्यांना 25 वर्षे का लागली आणि माझ्याकडे कधीही कोणतीही बंदूक सापडलेली नसतानाही मला ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत दोषी का ठरवण्यात आले, हे मला समजत नाही. असं म्हणत अभिनेत्याने प्रश्न उपस्थित केलेला.
Leave a Reply